Thursday, May 26, 2011

तुझ्या शिवाय जगणं दिवसेंदिवस कठीण होतं ....तुझ्याशिवाय  जगणं इतका त्रास दायक ठरू शकता याची कधी कल्पना देखील केली नव्हती .............पण आजही  तुझा माझ्या विश्वात नसणं अगदी आजही खरा वाटत नाही.......खरच कुठल्याच रुपात तुला थोडा वेळ का होईना माझ्यासोबत राहणं इतका  नकोसा झाला होता का ........आणि जर असा होता तर इतकी सवय का लावलीस मला तुझी ....नाही यार नाही सहन होता ह्या प्रश्नाची उत्तर शोधताना होणारी दमछाक सहन ....किती थकवा आलाय .....सगळी कोडी सोडवता सोडवता .....कि मनाचेच खेळ हे सारे ....भगवे कपडे घालून घ्यावा मीही संन्यास म्हणतेय ......नकोच तो भावभावनांचा  खेळ ,नको ती विश्लेषणं ,  नको ती पीडा देणारी  मोहमाया ...आयुष्यातला अजून तर एकाच टप्प्यात आहोत पण ऐन  तारुण्यातही आजवरच्या छोट्या मोठ्या आघातांनी मन आणि शरीर पार कोल्माडलाय .....कसा होणार पुढे माझा ...देव जाणो .....कि म्हणव हरी ओम ह्या सगळ्या भानगडीनां ....चालू आहे तसाच चालू द्यावा कि करावा बंड स्वतःच्याच विरोधात .... कि कधीच   कुणाची आठवन काढू नये .....कुणात गुंतावूच नये काळीजाचा तुकडा ......किती प्रश्न ..किती उत्तर .......किती अपेक्षा सगळ्यांच्याच ......माझ्याही माझ्याच कडून ........!!

Wednesday, May 25, 2011

ka kalena

कर्म करायची ...........जन्माला आलोच आहोत तर वाट्याला आलेली भोगही भोगायाचीत ........!! आज असले कसले कसले विचार मनाच्या गाभाऱ्यातून येत आहेत कुणास ठाऊक ........मनात आज फारच ढवळाढवळ झालीये ..........डोळेही डबडबलेले .......चेहऱ्यावर न लपवता येणारे भाव त्यात आज निसर्गाचाही भाव जर वेगळाच जाणवतोय .......सकाळपासूनच कावळा काव काव करतोय बिचारा .......त्याला नक्की प्रोब्लेम की असावा ................कि आज मनच माझा फार काहुर्लाय म्हणून त्याच्या नैसर्गिक वाग्न्याचाही मला इतका त्रागा होत असावा ......कधी कधी अगदी हद्दपार होता मेल मन .....कि आज ताब्येतच ठीक नाहीये ........काम हि धड झाला नाही माझ्याकडून .......न कशात मन लागला ......काय करावा तेच सुचत नव्हता म्हणून शेवटी लिहावा म्हटला काही तरी .......बघू एकाही नवीन सुचतंय का.............?