Thursday, May 26, 2011

तुझ्या शिवाय जगणं दिवसेंदिवस कठीण होतं ....तुझ्याशिवाय  जगणं इतका त्रास दायक ठरू शकता याची कधी कल्पना देखील केली नव्हती .............पण आजही  तुझा माझ्या विश्वात नसणं अगदी आजही खरा वाटत नाही.......खरच कुठल्याच रुपात तुला थोडा वेळ का होईना माझ्यासोबत राहणं इतका  नकोसा झाला होता का ........आणि जर असा होता तर इतकी सवय का लावलीस मला तुझी ....नाही यार नाही सहन होता ह्या प्रश्नाची उत्तर शोधताना होणारी दमछाक सहन ....किती थकवा आलाय .....सगळी कोडी सोडवता सोडवता .....कि मनाचेच खेळ हे सारे ....भगवे कपडे घालून घ्यावा मीही संन्यास म्हणतेय ......नकोच तो भावभावनांचा  खेळ ,नको ती विश्लेषणं ,  नको ती पीडा देणारी  मोहमाया ...आयुष्यातला अजून तर एकाच टप्प्यात आहोत पण ऐन  तारुण्यातही आजवरच्या छोट्या मोठ्या आघातांनी मन आणि शरीर पार कोल्माडलाय .....कसा होणार पुढे माझा ...देव जाणो .....कि म्हणव हरी ओम ह्या सगळ्या भानगडीनां ....चालू आहे तसाच चालू द्यावा कि करावा बंड स्वतःच्याच विरोधात .... कि कधीच   कुणाची आठवन काढू नये .....कुणात गुंतावूच नये काळीजाचा तुकडा ......किती प्रश्न ..किती उत्तर .......किती अपेक्षा सगळ्यांच्याच ......माझ्याही माझ्याच कडून ........!!

No comments:

Post a Comment