साचलेल्या डबक्यातल्या गढूळलेल्या पाण्यासारखी अवस्था आहे आज मनातल्या भावनांची .................महत्प्रयासाने स्थिर झालेली भावरूपी जलतरंग .पुन्हा कशाने तरी ढवळून निघालीत .........माझा नेमका काय चालू आहे हेच मला कळेनासा झालंय ......कधी कुणाचा मत्सर न करणार अन कधीही कुणाकडेही कसलीच अपेक्षा न ठेवणार ,माझ्याच विश्वात रमणार माझा मन आज इतका उदासला का आहे .......प्रचंड थकवा आल्यासारख्या जाणीव होतयेत ....का आला असावा इतका थकवा ?....कि अजूनही मनातला सगळा मोकळा न केल्याचा हा impact झाला असावा .....खरा तर हा ब्लोग लिहिण्याचा एकमेव हेतू हाच होता कि मनातला साराच निसंकोच पने रिता करता यावा ......पण अजूनही जे हृदयाच्या तळाशी अगदी खोल खोल जे दडलंय ते वर येत नाही ...शब्दरूप घ्यायला तयारच नाहीयेत ते भाव तरंग .........कि मलाच ते साधत नाहीये सरस्वतीचा ते अनमोल वरदान नसेलही बहुदा ह्या करांगुलीनमध्ये ........काहीही असो ...पण मीही हार नाही मानणार.........बघुयात हा प्रवास सुरु तर केलं .....काय काय शब्दांकित करायला जमतंय या अल्पबुद्धी जीवाला .......!!
No comments:
Post a Comment